तरीही ती आनंदीच🌹🌹🌸🌸🌸🌺
,,,,,मारोती आरेवार
काल सावलीच्या बाजारात माझी वर्गमैत्रीण भेटली.माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं.पण मला तिने पाहिले आणि आवाज दिला. मागे वळून पाहतो ,तर मी जरासा विचारताच पडलो,कोण असेल ही नंतर डोक्यात प्रकाश पडला. मी मनाशीच म्हणालो " अरे ही तर आनंदी' तीची सुस्वभावी छबी मला अजूनही आठवते.अभ्यासातही ती खूप हुशार होती.पण परिस्थितीमुळे तिला पुढे शिकायला मिळाले नाही.लग्न होऊन सासरी गेली.मीही खूप दिवसांनी तिला बघितलं नव्हतं.अरे मारोती मी आनंदी ओळखलं नाहीस.मी ओळखली तुला इथून जवळचं माझं सासर.
कामासाठी दहा बारा वर्ष चंद्रपूरला होतो.पतीदेवांचा अपघात झाल्यामुळे त्यांना जड काम जमत नाही म्हणून परत गावाकडे येऊन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतो. पतीदेवासाठी दवाखाण्याचा खूप खर्च आला. केली कमाई तिथेच घालवली.आता चार पाच महिने यातून सावरून पुन्हा नव्याने जगतो आहोत.
हे सर्व सांगताना तिचे पतीदेव शेजारीच बसले होते.माझी तिने त्यांच्याशी ओळख करून दिली.मीही तिला माझ्याबद्दल सांगितलं.
एवढं सारं घडूनही जगण्याची उमेद मात्र ती तसूभरही ढळू दिली नाही.संकटे प्रत्येकाच्या जीवनात असतात त्यांना पेलायचं कसं तिच्याकडूनच शिकावं.
एवढं सारं दुःख तिच्या वाट्याला असतानाही मला तितक्याच आपुलकीने आवाज देणं'विचारपूस करणं
सारं दुःख लपवून चेहऱ्यावरील आनंद तसूभरही कमी न होणं.खूप काही शिकवून गेलं.
अजूनही मनात तिचेच शब्द बसले आहेत
मनात विचार येतो
'तरीही ती आनंदीच'
खरच ती आनंदीच रहावी......
,,,,,मारोती आरेवार
काल सावलीच्या बाजारात माझी वर्गमैत्रीण भेटली.माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं.पण मला तिने पाहिले आणि आवाज दिला. मागे वळून पाहतो ,तर मी जरासा विचारताच पडलो,कोण असेल ही नंतर डोक्यात प्रकाश पडला. मी मनाशीच म्हणालो " अरे ही तर आनंदी' तीची सुस्वभावी छबी मला अजूनही आठवते.अभ्यासातही ती खूप हुशार होती.पण परिस्थितीमुळे तिला पुढे शिकायला मिळाले नाही.लग्न होऊन सासरी गेली.मीही खूप दिवसांनी तिला बघितलं नव्हतं.अरे मारोती मी आनंदी ओळखलं नाहीस.मी ओळखली तुला इथून जवळचं माझं सासर.
कामासाठी दहा बारा वर्ष चंद्रपूरला होतो.पतीदेवांचा अपघात झाल्यामुळे त्यांना जड काम जमत नाही म्हणून परत गावाकडे येऊन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतो. पतीदेवासाठी दवाखाण्याचा खूप खर्च आला. केली कमाई तिथेच घालवली.आता चार पाच महिने यातून सावरून पुन्हा नव्याने जगतो आहोत.
हे सर्व सांगताना तिचे पतीदेव शेजारीच बसले होते.माझी तिने त्यांच्याशी ओळख करून दिली.मीही तिला माझ्याबद्दल सांगितलं.
एवढं सारं घडूनही जगण्याची उमेद मात्र ती तसूभरही ढळू दिली नाही.संकटे प्रत्येकाच्या जीवनात असतात त्यांना पेलायचं कसं तिच्याकडूनच शिकावं.
एवढं सारं दुःख तिच्या वाट्याला असतानाही मला तितक्याच आपुलकीने आवाज देणं'विचारपूस करणं
सारं दुःख लपवून चेहऱ्यावरील आनंद तसूभरही कमी न होणं.खूप काही शिकवून गेलं.
अजूनही मनात तिचेच शब्द बसले आहेत
मनात विचार येतो
'तरीही ती आनंदीच'
खरच ती आनंदीच रहावी......
No comments:
Post a Comment